मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मुळात अभिजात असणाऱ्या मराठी भाषेच्या अभिजाततेवर अखेर शिक्कामोर्तब.
आज मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठीचा सन्मान झाला.
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालील प्रमाणे ठरवलेले आहेत.
- भाषा प्राचीन आणि भाषेतील साहित्य श्रेष्ठ असावे
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
- भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावे
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. भारत सरकारने आत्तापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरू होत्या त्यामुळेच प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना केल्या गेली होती.
मराठी भाषेतील ग्रंथ धनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. अभिजात दर्जाने भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत :
मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे. इ.
2013 या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली सादर केलेला अहवाल खालील प्रमाणे होता.